Wednesday, July 30, 2008

कहाणी ही एका वेडया मनाची....................!

कहाणी ही एका वेडया मनाची....................! 

वाळुवर बनवलेली 
दोन घरं मी स्वत:ची 
एक ते लाटेत कोलमडलं 
आणि दुसरं ते वाहुण गेलं 
काय दोष द्यावा त्या लाटेला ? 
वाळुवर घर बनवणं 
ही गोष्ट्च मुळ चुकीची 
कहाणी ही एका वेडया मनाची....................! 

श्रावणात बहर आला 
अख्या रानाला पण 
एक कळीही ना 
उमलली माझ्या अंगणाला 
माझ्या अंगणात होते 
हिच चुक का त्या रोपांची 
कहाणी ही एका वेडया मनाची....................! 

चमकत्या त्या वस्तुला 
मी नेहमीच सोनं मानलं 
समजाऊनही न बदलली 
नितीमत्ता माझी 
हाव होती तेव्हा मला 
त्या चमकत्या सोन्याची 
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

आता सगळं संपलय, 
उठलाय सगळा बाजार 
जडलाय मनाला 
एकटेपणाचा भयंकर आजार 
डोळ्यात माझ्या डोलतेय 
मजेत आता माळ आसवांची 
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

पाहतोय मी वाट एक 
नवी सकाळ उजाडण्याची 
पण आता घाई नाही करणार 
नवा बाजार मांड्ण्याची 
आणि आता वाट पाहणार 
नाही कुणाच्या वाटही साथीची 
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

Tuesday, July 29, 2008

आयुष्य खुप छान आहे,

आयुष्य खुप छान आहे,
सोबत कोणी नसले तरी,
एकट्याने ते फ़ुलवत रहा!
वादळात सर्व वाहुन गेले ,
म्हणुन रडत बसु नका!
वेगळे अस काही माझ्यात खास नाहि,
म्हणुन उदास होऊ नका!
मॄगाकडे कस्तुरी आहे,
फ़ुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे?
असे म्हणून रडु नका!
अंधाराला जाळणारा एक सुर्य,
तुमच्यातही लपला आहे!

Wednesday, July 23, 2008

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!

मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो

जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं

ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं

सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो

ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो

नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालंएवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलंधाडस करुन मी तिला प्रपोज केलंत्यावर
ती म्हणते कशी,"बारा महिने एकत्र भिरलोहे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,नविन वर्ष नाही का आलं?"

मन हे नेहमीफुलपाखरासारखं असावं

एकिने नाही म्हटलं तर काय झालं

लगेच दुसरीवर बसायला हवं!!

आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले

आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले
आज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं समजलो मी त्यांना नेहमी कठोर रागीट भावनांचा पण कळल्याच नाहि कधी त्यांच्या मृद भावना केला उपमर्द नेहमी त्यांच्या भावनांचा भावनांचा आज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं मी त्यांना नेहमी कठोर समजायचो,कठोर समजायचो दुखी: झालो की रागाने तड़क बाहेर जायचो आजारी पडलो मी की त्यांना रडताना पहायचो हसलो मी की त्यांना हसताना पहायचो आज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं मोठा झालो खर्च वाढले आज मी कमवायला लागलो मी ही मित्रांसारखा मज्जा करायला लागलो ना कश्यांची खंत ना कश्याचा गम मुलांबरोबर फिरायला लागलो छान छान स्टाइल ने पैसे उड़वायला लागलो उड़वायला लागलो आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले ते जळत राहिले माझ्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी मी मात्र अंग अंग नोचले त्यांचे माझ्या स्वप्नांसाठी स्वताच्याच हातून त्यांच्या स्वप्नांचा केला खून स्वतासाठीहोय आज मी माझ्या वडिलांना रडताना पहिलं रडताना पहिलंअखेर गेले ते कंटालून गेले जगाला रामराम करुन आज मी मलाच रडताना पाहिले रडताना पाहिले चुक कळली पण उशिराने वेळ निघून गेल्या सारख वाटतयत्यांच्या स्वप्नाना पूर्ण करावस वाटतयकुशित जाउन राडावस वाटतय राडावस वाटतयपण..ते आज नाहित मला राडावस वाटतयआज मी मलाच रडताना पहिलं रडताना पहिलं

Arrange Marriage Poem Read n Reply

"अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम"
"अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम" पत्त्यांची
जशी नेहमी "ब्लाइण्ड गेम" असते
तशी ठरवून केलेल्या लग्नाचीही असते......
तो-तिला नि ती-त्याला ओळखतही नसते
वीसेक लोकांत ओळख पाटलेलिही नसते....
होकार असाच एका नजरेत द्यायचा असतो
बाकी सर्व नशिबवर सोडून द्यायचे असते...
कहीना कधी कधी असाच गुलामही मिळतो
तर कहीना कधी हुकूमि एक्का लाभतो....
काहीच्या नशिबी मात्र दुररी-तीर्री च येते
कारण ही एक "ब्लाइण्ड गेम" असते....
येईल त्या पत्ताने खेळून दाखवायाचे असते
जिंकून हरण्यापेक्षा,हारून जिंकायचे असते....
कारण "ब्लाइण्ड" जरी असली
तरी ही आयुष्याची "गेम" असते...

Fav Kavita Read And Reply

"बाप"
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली. तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला. स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा. पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला. शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं. आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो."आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं. बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय. त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.आणि आता कुठे सुरुवात झाली आहे...

.................राहुल........
--------------------------------------------------------------------------------------------
कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही
कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाहीआरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाहीप्रेम आणि स्वात्यंत्र हे विरूध्दार्थी शब्द आहेतपंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतोमेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाहीआयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखंपण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाहीपूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाहीजेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाहीआले जर माझ्या डोळ्यात पाणी तर हारलो मी म्हणून दैव सुखावेलम्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही ...
----------------------------------------------------------------------------------------------

थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाहीपण जसच्या तस काहीकही राहत नाहीथान्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाहीधपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटतकी आई जवळ हवी होतीअन दरवाज्यातल्या मोटारीपेक्षा वाटतकी जुनी सायकलच बरी होतीआदिदास असो वा रामदास असो आजीच्या हातच्या लोणच्यापुढेसार काही दास आहेत्याचीच आठवण येऊन आजमन मात्र उदास आहेआठवणीच्या ह्या सावल्यान्कडे मी आजकाल पाहत नाहीथाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाहीपुर्वी छत्री हरवली होती आता छत्रहि हरवल आहेप्रेयसीला लिहीलेल पहीलवहील पत्रही हरवल आहेपावसाच्या प्रत्येक थेम्बाप्रमाणेतिची छबी नवी होतीनजर चुकवण्यासाठी का होईनापण ती जवळ हवी होतीएरवी मुसळधार पावसात चिम्ब भिजणारा मीआज पावसाच्या वाटेलाही जात नाहीथाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाहीकाळ बदलला वेळ बदलली देश बदलला वेष बदललानाती बदलली माती बदलली तरीसुध्दा तरीसुध्दामन काही प्रवाहाबरोबर वाहत नाहीखरच....थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही delete

♥♥!!R@ राहूल!!♥♥
------------------------------------------------------------------------------------------
प्रेमात पडणं सोपं असतं...
प्रेम...प्रेमात पडणं सोपं असतंपण प्रेम निभावणं कठीण असतं.....हातात हात घेउन चालणं सोपं असतंपण तोच हात आयुष्यभर हातात घेउनपाउलवाट शोधणं कठीण असतं,कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोपं असतंपण ती गुतंवणूक आयुष्यभर जपणं कठीणं असतंमाझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोपं असतंपण तोच विश्वास कायम ठेवून वाटचालंकरणं मात्र कठीणं असतंप्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतंपण ती वचनं आणि शपथा निभावनंमात्र फ़ारच कठीणं असतंप्रेमात खोटं बोलणं सोपं असतंपण खर बोलून प्रेम टिकवनंमात्र नक्कीच कठीणं असतंम्हणून सांगते की प्रेमात पडणंसोपं नसतं, सोपं नसतं, सोपं नसतं....

------------------------------------------------------------------------

आपल्या जवळ जे नाही.........
आपल्या जवळ जे नाहीत्याचीच मानवी मनाला ओढ असतेसर्वच मनं सारखी घडत नसतातम्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते ......... फुले शिकवतात......,गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,काट्यात सुध्दा हसायचं असतं;रात रानी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं.

-------------------------------------------------------------------------

Thursday, July 17, 2008

Love Marriage Vs Arrange Marriage



What you opinion tell me ?


Love Marriage is Better or


Arrange Marriage ?



Be Honest Answer, I want know you more my dear all friendss Come on join the Debet of here